लोकांना चारोळ्या कशा बरं सुचतात
शब्द नि ओळी कशा एकमेकांत गुंततात
लोक छान छान कविता कशा बरे लिहितात
सुबक आणि सुंदर कसे बरे यमक जुळवतात
मनात आलेली कल्पना कागदावर उतरते कशी
तीही अगदी रेखीव, जशी नक्षी मोरपिशी?
'त' ला 'त' जुळवताना आमची उडते भंबेरी
यांची मात्र ओळी, कडवी, नि गाण्यांवर हि मक्तेदारी!
का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
काहींच्या मनात प्रश्नच प्रश्न
नि काहींच्या वदनी सरस्वती वसते?
शब्द नि ओळी कशा एकमेकांत गुंततात
लोक छान छान कविता कशा बरे लिहितात
सुबक आणि सुंदर कसे बरे यमक जुळवतात
मनात आलेली कल्पना कागदावर उतरते कशी
तीही अगदी रेखीव, जशी नक्षी मोरपिशी?
'त' ला 'त' जुळवताना आमची उडते भंबेरी
यांची मात्र ओळी, कडवी, नि गाण्यांवर हि मक्तेदारी!
का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
काहींच्या मनात प्रश्नच प्रश्न
नि काहींच्या वदनी सरस्वती वसते?
No comments:
Post a Comment