Monday, May 21, 2007

कविता लिहायचा प्रयत्न

लोकांना चारोळ्या कशा बरं सुचतात
शब्द नि ओळी कशा एकमेकांत गुंततात
 लोक छान छान कविता कशा बरे लिहितात
 सुबक आणि सुंदर कसे बरे यमक जुळवतात

मनात आलेली कल्पना कागदावर उतरते कशी
तीही अगदी रेखीव, जशी नक्षी मोरपिशी?
'त' ला 'त' जुळवताना आमची उडते भंबेरी
यांची मात्र ओळी, कडवी, नि गाण्यांवर हि मक्तेदारी!

का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
 का रे देवा कवी मन सगळ्यांकडे नसते?
काहींच्या मनात प्रश्नच प्रश्न
नि काहींच्या वदनी सरस्वती वसते?

No comments:

Post a Comment